राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
रायगड अलिबाग
दि.10 :-विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ते आठ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या
विविध पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये एकूण 209 गुन्हे नोंद केले असून त्यात 130 व्यक्तींना
अटक करण्यात आली आहे. त्यात एकूण रु.32 लाख
57 हजार 608 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच एकूण 14 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
निवडणूक कालावधीमध्ये
मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी
या विभागाने विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार
वाहन तपासणी करणे, संशयित ठिकाणांवर छापे टाकणे व रात्रीच्या वेळी गस्त घालणे अशी कारवाई
करण्यात येत आहे. कलम 93 अंतर्गत सराईत गुन्हेगारांकडून
चांगल्या वर्तणुकीबाबतचे बंधपत्र घेण्यासाठी संबंधित प्रांताधिकारी यांना प्रस्ताव
सादर करण्यात आलेले आहेत. निवडणूक कालावधीमध्ये
बंधपत्राचा भंग केल्यास गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आचारसंहिता कालावधीमध्ये मद्यविक्री अनुज्ञप्त्या
विहित वेळेत उघडणे व बंद करणे यावर क्षेत्रीय अधिकारी विशेष लक्ष ठेऊन आहेत. या
नियमांचे उल्लघन करणाऱ्या अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचे निर्देश आहेत
अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क रायगड-अलिबाग यांनी दिली आहे.
००००००
Comments
Post a Comment