जिल्ह्यात 1 हजार 427 कारखाने नोंदणीकृत, पैकी अत्यावश्यक सेवा /उत्पादन संवर्गातील 282 कारखान्यांना 50 टक्के कामगार संख्येत कारखाना सुरू ठेवण्यास प्रशासनाची परवानगी



अलिबाग,दि.02 (जिमाका) :करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.
          रायगड जिल्ह्यात 1 हजार 427 कारखाने नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 282  कारखान्यांना लॉकडाऊन च्या काळात ५०% कामगार संख्येत कारखाना सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. अशी परवानगी देताना  औषध निर्मिती करणारे कारखाने,  अन्नपदार्थ प्रक्रिया करणारे कारखाने, किंवा अत्यावश्यक उत्पादन करणारे कारखाने, या कारखान्यांसाठी आवश्यक कच्चा माल तयार करणारे किंवा पूरक सेवा देणारे कारखाने यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
            JSW डोलवी हा खनिजापासून पोलाद निर्मिती करणारा कारखाना आहे. हा कारखाना अत्यावश्यक उत्पादन करणारा कारखाना आहे. या कारखान्यात आजपर्यंत कोक ओव्हन प्लांट, ब्लास्ट फर्नेस व SMS प्लांट सुरू आहेत. एकूण ८ हजार  कामगारांपैकी 1 हजार 400 कामगार आज कामावर आहेत, हा कारखाना तीन शिफ्टमधे चालतो. कारखान्यातील सुरक्षितता सांभाळण्यासाठी सतत तीनही शिफ्टमधे प्रत्येकी 20  सेफ्टी अॅंड फायर ऑफीसर कार्यरत आहेत. हे सेफ्टी सेफ्टी अँड फायर ऑफिसर्स प्रशिक्षित आहेत.     
            याबाबत केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या दि.24 मार्च 2020 च्या  पत्रानुसार पोलाद निर्मिती कारखाने अत्यावश्यक उत्पादन करणारे आहेत, ही बाब  स्पष्ट करण्यात आली आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक