जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर,व्यक्तींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन
वृत्त
क्रमांक :- 352
दिनांक :- 14 मे 2020
अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका) : लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात
परराज्यातील अडकलेल्या मजूर/अन्य व्यक्तींच्या जिल्हा व राज्यांच्या रायगड जिल्हा प्रशासन संपर्कात आहे. हा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने या जिल्ह्यात
अनेक जिल्हा उद्योग, कारखाने आणि बांधकामाची सुरू झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता कोणत्याही प्रकारे कामाची
कमतरता भासत नाही. तरीही आपणास आपल्या राज्यातील
मूळ गावी जायचे असेल तर जिल्हा प्रशासन आपल्या
जाण्याची व्यवस्था करीत आहे, मात्र जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील
मजूर/व्यक्तींनी संयम बाळगावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
आपल्या आवाहनाद्वारे जिल्हाधिकारी
श्रीमती चौधरी यांनी पुढे म्हटले आहे, आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अडकलेल्या
लोकांना त्यांच्या स्वत:चे वाहन, बस किंवा रेल्वेने पाठविण्याची व्यवस्था केली आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत 6 गाड्या मध्यप्रदेश, ओडिशा
आणि बिहार येथे पाठविण्यात आल्या आहेत. या
जिल्ह्यात अडकलेल्या कामगार व कामगारांची नावेही आम्ही त्यांच्या मूळ राज्यात पाठविली
आहेत. आपल्या राज्यात श्रमिक ट्रेन मंजूर होताच
प्रशासन आपल्याशी संपर्क साधेल आणि बस किंवा ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्रशासनाद्वारे
आपली वैद्यकीय तपासणी केली जाईल. याचा अर्थ, आपल्याला सध्या तरी कोणत्याही रुग्णालयात
किंवा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.
तुम्ही जेथे असाल तेथे सुरक्षित रहा, ट्रेन
किंवा बसची व्यवस्था केली गेली तर जिल्हा प्रशासन तुमच्या राज्याची मान्यता मिळाल्याबरोबर
तुमच्याशी स्वत:हून संपर्क साधेल आणि तुम्हाला सुखरुप घरी घेऊन जाण्याची व्यवस्था करेल. आतापर्यंत, आपण रायगड जिल्हा प्रशासनावर ज्या प्रकारे
विश्वास ठेवला आहे, तो तसाच पुढे ठेवावा जेणेकरुन हा जिल्हा करोनाविरूद्धच्या लढ्यात
यशस्वी होऊ शकेल, असे शेवटी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी म्हणाल्या आहेत.
000000
Comments
Post a Comment