चक्रीवादळात नुकसान झालेल्या माणगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द
अलिबाग,जि.रायगड, दि. 14 (जिमाका) :- जिल्ह्यातील
दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे
जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड
झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले
आहे.
या चक्रीवादळात नुकसान झालेल्या माणगाव तालुक्यातील माणगाव तहसिलअंतर्गत
असलेल्या गावांमधील नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते
आर्थिक मदतीचे धनादेश, दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ वितरित करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियांका
आयरे,सुभाष केकाने, माजी जिल्हा परिषद सदस्य अस्लम राऊत, पंचायत समिती सदस्य शैलेश
बोरकर, शेखरशेठ देशमुख, इक्बाल शेठ धनसे, काका नवगणे, दीपक जाधव, उदय अधिकारी, दीपक
महाजन सरपंच इंदापूर, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, रत्नाकर उभारे, नगरसेवक रवी मोरे
उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment