चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक येणार रायगड जिल्ह्यात
अलिबाग,जि.रायगड,
दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील
दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे
जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे
नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनाचे आंतर
मंत्रालयीन पथक रायगड जिल्ह्यात दि. 16
जून रोजी येणार आहे. त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे :-
मंगळवार
दि.16 जून, 2020 रोजी सकाळी 9.00 वा. भाऊचा धक्का, मुंबईकडे प्रयाण. सकाळी 9.15
वा. भाऊचा धक्का, मुंबई येथे आगमन व रो-रो बोटीने मांडवा जेट्टी, जि.रायगड कडे
प्रयाण. सकाळी 10.00 वा. मांडवा जेट्टी
जि.रायगड येथे आगमन व मोटारीने नागाव ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 10.40 वा. नागाव
येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी
11.20 वा. चौल येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 12.20 वा. काशिद ता.मुरुड येथे आगमन व
नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 1.10
वा. मुरुड येथे आगमन. दुपारी 1.10 ते 2.00
वा. जिल्हाधिकारी यांचे जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे
सादरीकरण व राखीव मुरुड. दुपारी 2.00 वा. दिवेआगर,ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी
3.00 वा. दिवेआगर येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 4.00 वा.
तुरुंबडी येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सायं. 4.45 वा.खरसई येथे आगमन व नुकसानग्रस्त
भागाची पाहणी. सायं. 5.15
वा. महाड, जि.रायगकडे प्रयाण. सायं.6.45
वा. महाड येथे आगमन व मुक्काम.
000000
Comments
Post a Comment