राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर रायगड मधून आरसीएफ थळ चे कर्मचारी शरद पाटील यांची निवड
अलिबाग,
जि.रायगड, दि.23 (जिमाका) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (महाराष्ट्र राज्य अंगीकृत
संस्था) च्या वतीने जो कामगार सामाजिक, शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, कला-क्रीडा,
संघटना व आस्थापना आदी. बाबींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतो, अशा कामगारांना
"गुणवंत कामगार कल्याण" पुरस्कार देऊन गौरविले जाते. हे गुणवंत कामगार
समाजासाठी भूषणावह असतात. राज्यावर, देशावर ज्यावेळी अस्मानी संकट व नैसर्गिक आपत्ती
ओढवते त्यावेळी शासनाला सर्वोताेपरी सहकार्य करण्यासाठी या सर्व गुणवंत कामगारांचा
सक्रिय सहभाग असतो. राज्यातील अशा गुणवंत कामगार
बंधू -भगिनींनी, सर्व क्षेत्रातील कामगार व समाजातील सर्व घटकांसाठी, भविष्यात
"राजकारण विरहित", विधायक कार्य करण्याच्या हेतूने एकत्र येऊन, " राज्य
गुणवंत कामगार असोसिएशन " (कार्यक्षेत्र-महाराष्ट्र राज्य) या संघटनेची स्थापना
करण्यात आली आहे. .
सध्याच्या करोनाच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर
असोसिएशनची नुकतीच ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्य कार्यकारिणी
जाहीर करण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष,सुरेश केसरकर (कोल्हापूर),उपाध्यक्ष
मा.नरेंद्र रहाटे (चंद्रपूर), अच्युतराव माने (उस्मानाबाद), तात्यासाहेब भोसले (सोलापूर),
दिलीप घोलप (मुंबई उपशहर) सचिव, स्वानंद राजपाठक (पुणे), सहसचिव मुकुंद कोकणे (औरंगाबाद),
खजिनदार सुहास वड्डीकर (सांगली), सह खजिनदार देवराव कोंडेकर (गडचिरोली) सदस्य : सोपान
बांगर (अहमदनगर), रामेश्वर वरखडे- (जालना), सुधीर मुंडे (बीड), किसन शिरलेकर (परभणी),
काशीनाथ जनगावे (लातूर), शेख सलीमोद्दीन (हिंगोली),
रत्नाकर शिंदे (नांदेड), अनिल मावळे (अकोला), अरुणकुमार आठवले (अमरावती), महादेव चक्के (कोल्हापूर), नितीन गादेवार(गोंदिया),
शैलेंद्रनाथ इंगळे (जळगाव), केरबा डावरे- (ठाणे), भगवान पाटील (धुळे), गुलाबराव सोनवणे
(नंदुरबार) , अरविंद देशमुख (नागपूर), मारुती जाधव (नाशिक), धनंजय पाटील (पालघर), सुरेश
साबळे (बुलढाणा), प्रमोद नागदेवे (भंडारा) , प्रभाकर कांबळे (मुंबई) अरविंद जनबदकर
(यवतमाळ), संजय सुर्वे (रत्नागिरी) , शरद पाटील (रायगड,आरसीएफ, थळ येथील कर्मचारी),
चंद्रसेन डोंगरे (वर्धा), निलेश सोमाणी (वाशिम), शिवाजी इंगवले (सातारा) , दिलीप साटम
(सिंधुदुर्ग) यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल सर्वच पदाधिकारी व जिल्हा प्रतिनिधींचा समाजातील सर्व
घटक व कामगार वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र कामगार मंडळाच्या वतीने दरवर्षी गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात
येतो. हा पुरस्कारप्राप्त राज्यातील गुणवंत कामगारांनी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची
स्थापना केली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी कोल्हापूर येथील सुरेश केसरकर यांची निवड
झाली आहे.
करोनाचे संकट असतानादेखील कामगारांच्या हितासाठी 36 जिल्ह्यातील 37 गुणवंत कामगारांची
कार्यकारिणी स्थापित करण्यात आली आहे.
000000
Comments
Post a Comment