अनाथ बालकांना शालेय साहित्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप
अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):- पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी एसओएस बालग्राम
सोगाव अलिबाग येथे भेट देऊन तेथील निराधार, आई-वडील नसलेल्या बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त
शालेय साहित्य वाटप केले. या बालग्राम मध्ये 157 विद्यार्थी आहेत. यावेळी
पालकमंत्री महोदयांनी येथील बालकांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना व उपस्थित
कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, संस्थेचे संचालक राकेश सिन्हा, सहाय्यक संचालक शिवरुद्र
लुपने, व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment