*“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 34 हजार 617 जणांनी केली करोनावर मात*

अलिबाग,जि.रायगड दि. 20 (जिमाका):-* स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 34 हजार 617 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 637 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 115, पनवेल ग्रामीण-749, उरण-197, खालापूर-279, कर्जत-253, पेण-469, अलिबाग-582, मुरुड-41, माणगाव-364, तळा-45, रोहा-371, सुधागड-68, श्रीवर्धन-45, म्हसळा-44, महाड-132, पोलादपूर-57 अशी एकूण 5 हजार 811 झाली आहे.

          कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-13 हजार 978, पनवेल ग्रामीण-4 हजार 443, उरण-1 हजार 454, खालापूर-1 हजार 957, कर्जत- 1 हजार 155, पेण-2 हजार 722, अलिबाग-3 हजार 276, मुरुड-277, माणगाव- 1 हजार 217, तळा-91, रोहा-1 हजार 661, सुधागड-281, श्रीवर्धन-283, म्हसळा-239, महाड- 1 हजार 306, पोलादपूर-277 अशी एकूण 34 हजार 617 आहे.          

             आज दिवसभरातही पनवेल मनपा-192, पनवेल ग्रामीण-60, उरण-7, खालापूर-35, कर्जत-27, पेण-56, अलिबाग-100,  मुरुड-23,  माणगाव-36,  रोहा-63,  सुधागड-1,  म्हसळा-4,  महाड-28, पोलादपूर-5 असे  एकूण 637 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

          आतापर्यंत पनवेल मनपा-370, पनवेल ग्रामीण-89, उरण-86, खालापूर-93, कर्जत-62, पेण-86, अलिबाग-88, मुरुड-21, माणगाव-25, तळा-8, रोहा-59, सुधागाड-18, श्रीवर्धन-18, म्हसळा-11, महाड-55, पोलादपूर-15 असे एकूण 1 हजार 104 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

        आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-212, पनवेल ग्रामीण-46, उरण-23, खालापूर-36, कर्जत-25, पेण-43, अलिबाग-69, मुरुड-3,  माणगाव-29, रोहा-36, सुधागाड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-7, महाड-14, पोलादपूर-7 असे एकूण 554 ने वाढ झाली आहे.

         आजच्या दिवसात 10 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-1, कर्जत-2, अलिबाग-2, तळा-1, रोहा-3, सुधागड-1)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

          आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 43 हजार 687 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 288 आहे.

00000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक