जिल्ह्यातील प्रलंबित महत्त्वाचे विषय तात्काळ मार्गी लावावेत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश
अलिबाग,जि.रायगड
दि. 16 (जिमाका) :- रायगड
जिल्ह्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांमार्फत विविध उपक्रम, योजना व
उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी सर्व विभागांनी तयार केलेल्या
प्रस्तावास कालबद्ध कालावधीमध्ये शासनाची मान्यता घेणे व त्याची प्रत्यक्ष
अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
या बाबीचा सर्वंकष विचार करुन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी
जिल्हास्तरीय विभागप्रमुखांनी शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या
विषयांची यादी तयार करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व जिल्हास्तरीय विभागप्रमुखांची
बैठक घेऊन विभागनिहाय शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विषयांची यादी
संबंधित विभागप्रमुखांकडून दरमहा प्राप्त करून घ्यावी, त्याची प्रत राज्यमंत्री
तथा पालकमंत्री, रायगड यांच्या कार्यालयात सादर करावी, शासन स्तरावर प्रलंबित
असलेल्या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी आवश्यक माहिती सादर करणे व त्याच्या
समन्वयासाठी विभागप्रमुखांनी दर पंधरवड्यामध्ये सोमवारी राज्यमंत्री तथा
पालकमंत्री, रायगड या कार्यालयाशी समन्वय ठेवून प्रस्तावांची सद्य:स्थिती व आवश्यक
कार्यवाहीबाबत अवगत करावे, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यानही याबाबत
वेळोवेळी अवगत करावे, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांसाठी तसे परिपत्रक
निर्गमित करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
000000
Comments
Post a Comment