नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करु या जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
त्यादृष्टीने करोनाच्या अनुषंगाने
दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप
देण्यासाठी व दि. 01 जानेवारी, 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने
नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे,31
डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक
ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंग (सामाजिक अंतर) राहील
तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन
लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्येदेखील अनेक
ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते, त्या दृष्टीने करोनाचा प्रादूर्भाव पाहता
नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे,करोनाच्या पार्श्वभूमीवर वय
वर्षे 60 वरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या
दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने
कोणत्याही प्रकारे धार्मिक/ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका
काढण्यात येऊ नयेत, नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी
जात असतात, अशा वेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन
करावे, तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या
उपाययोजना कराव्यात, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदूषणाच्या
अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, कोविड-19 या विषाणूंचा प्रादूर्भाव
रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग
तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे
काटेकोर पालन करावे, तसेच या सूचनांनंतर दि.31 डिसेंबर, 2020 व नूतन वर्ष सुरु
होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील
अनुपालन करावे, अशा मार्गदर्शक सूचना शासनाने दि.28 डिसेंबर 2020 च्या
परिपत्रकान्वये जारी केल्या आहेत.
तरी नागरिकांनी या सूचनांचे
काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
००००००
अलिबाग,जि.रायगड दि.28 (जिमाका) :-
राज्यात दि. 22 डिसेंबर, 2020 ते 05जानेवारी, 2021
या कालावधीत रात्री 11.00ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू
करण्यात आली आहे. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता
त्याचप्रमाणे शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेता 31 डिसेंबर, 2020 व नूतन
वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.
त्यादृष्टीने करोनाच्या अनुषंगाने
दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप
देण्यासाठी व दि. 01 जानेवारी, 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने
नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे,31
डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक
ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंग (सामाजिक अंतर) राहील
तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन
लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्येदेखील अनेक
ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते, त्या दृष्टीने करोनाचा प्रादूर्भाव पाहता
नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे,करोनाच्या पार्श्वभूमीवर वय
वर्षे 60 वरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या
दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने
कोणत्याही प्रकारे धार्मिक/ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका
काढण्यात येऊ नयेत, नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी
जात असतात, अशा वेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन
करावे, तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या
उपाययोजना कराव्यात, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदूषणाच्या
अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, कोविड-19 या विषाणूंचा प्रादूर्भाव
रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग
तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे
काटेकोर पालन करावे, तसेच या सूचनांनंतर दि.31 डिसेंबर, 2020 व नूतन वर्ष सुरु
होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील
अनुपालन करावे, अशा मार्गदर्शक सूचना शासनाने दि.28 डिसेंबर 2020 च्या
परिपत्रकान्वये जारी केल्या आहेत.
तरी नागरिकांनी या सूचनांचे
काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
००००००
Comments
Post a Comment