जिल्ह्यात अतिवृष्टीच्या दरम्यान काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- दि.11 ते 15 जुलै, 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. या कालावधीमध्ये आवश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नये, घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे, घराच्या अवतीभवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तू वीजेचे खांब किंवा तारा. झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे, आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे, आपले जवळ दैनंदिन लागणारे औषधे, केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती,स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात मोबाईल फोन, बॅटऱ्या चार्ज करून ठेवाव्यात,अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये किमान 3 दिवस पुरतील असे सुकामेवा खाद्यपदार्थ जवळ ठेवावेत. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे पिण्याचे पाणी शुध्दीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे, पाण्यात मेडीक्लोर मिसळावे, अतिवृष्टीबाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा, रेडिओसाठी काही जास्त सेल/बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात, अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र/खाडी किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व घराबाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, पाऊस पडत असताना मासेमारीसाठी व पोहायला समुद्र/खाडी, तलाव, धबधव्याच्या ठिकाणी जावू नये, घरीच थांबावे, वीजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, मोबाईलचा वापर करु नये, ग्रामकृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसिल कार्यालयास माहिती द्यावी, ग्रामकृतीदलाच्या सूचनेनुसार व जिल्हा स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी पाठवताना कोविड रुग्ण एकमेकांत मिसळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.

 या व्यतिरिक्त मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत/ तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 02141-222097/227452 वर संपर्क साधावा किंवा मो.8275152363 नंबर वर व्हॉटसअॅप करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक