शासनाच्या खावटी अनुदान योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये -पालकमंत्री कु.आदिती तटकरे
अलिबाग,जि.रायगड
दि.19 (जिमाका) :- राज्य शासनाच्या
वतीने गरीब समाज असणाऱ्या आदिवासी कुटुंबासाठी सुरु करण्यात आलेल्या खावटी वाटप योजनेची
सुरुवात रायगड जिल्ह्यातून करण्यात आली असून या योजनेतील एकही लाभार्थी वंचित राहू
नये, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
नुकतेच कर्जत तालुक्यातील पिंगळस शासकीय माध्यमिक
आश्रमशाळा येथे झालेल्या खावटी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
कर्जत येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या
हस्ते पात्र लाभार्थ्यांना खावटी अन्नधान्य
कीट वाटप देवून कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा
परिषद सदस्य नरेश पाटील, सदस्या सौ.रेखा भास्कर दिसले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, सहायक प्रकल्प अधिकारी श्री.खेडकर, तहसिलदार विक्रम
देशमुख, गटविकास अधिकारी बालाजी पुरी तसेच आश्रमशाळेचे शिक्षक वर्ग आदि उपस्थिती होते.
यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की,
रायगड जिल्ह्यातील 48 हजारहून अधिक लाभार्थ्यांना आदिवासी विभागांतर्गत खावटी अनुदान
योजनेतून अन्नधान्य, किराणा साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली असून कर्जत तालुक्यातील
लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात खावटी योजनेचा प्रांरभ करण्यात आला आहे. खावटी योजना आदिवासी बांधवांच्या हक्काची योजना
असून या योजनेचा अधिकाधिक लाभ आदिवासी बांधवांना द्यावा. \जिल्ह्यातील आदिवासी विभागासाठी अधिकाधिक निधी
देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागाचे अधिकारी,
कर्मचारी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment