दिव्यांग कल्याण निधीमधील वैयक्तिक अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूक व गरजू दिव्यांगांनी अर्ज करावेत
अलिबाग,जि.रायगड,दि.02
(जिमाका) :- रायगड
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याण कक्षामार्फत सन 2021-22
मधील राबविण्यात येणाऱ्या 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीमधील DBT तत्वानुसार वैयक्तिक
अर्थसहाय्याच्या दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (व्हेन्डींग
स्टॉल/पोट गिरणी/ शिलाई मशिन/मिरची कांडप मशिन/फूड प्रोसेसिंग पुनिट झेरॉक्स मशिन,
शेवया मशिन इत्यादी, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (पापड मशिन,
कागदी पिशव्या बनविण्याचे मशिन, पत्रावळी बनविण्याचे मशिन, काजू सोलण्याचे मशिन इत्यादी.),
दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे (संबंधित शाळेमार्फत प्रस्ताव
सादर करावा), दिव्यांग अव्यंग व्यक्तीशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे (01 एप्रिल
2014 नंतरचे विवाहित जोडपे असणे आवश्यक आहे.), दिव्यांग व्यक्तींना पत्रा स्टॉल पुरविणे,
दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार थेरपीसाठी अर्थसहाय्य देणे (उदा. फिजिओथेरपी,
स्पीच थेरपी, अॅक्युपंचर इ.), पॅरा ऑलंम्पिक
स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता दिव्यांगांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, दिव्यांग
व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य देणे, या योजना राबविण्यात
येत आहेत.
या योजनांचा लाभ मिळण्यासाठी
विहित नमुन्यातील अर्ज, रायगड जिल्ह्याचा रहिवासी दाखला किंवा रेशनिंग कार्डची झेरॉक्स
प्रत, वैद्यकीय मंडळाकडील किमान 40 टक्के दिव्यांगत्वाचा
दाखला, BPL घटकातील लाभार्थ्यास प्राधान्य, सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा वार्षिक
दाखला (रु.1,00,000/-च्या आतील अथवा कुटुंब दारिद्रय रेषेखाली असल्याचा संबंधित ग्रामसेवकाचा
दाखला, मतिमंद व बहुविकलांग पाल्याच्या पालकांस लाभासाठी पात्र ठरविण्यात येईल ( पाल्याच्या
अपंगत्वाचा दाखला सादर करणे अनिवार्य), या पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, बँक
पासबुकची झेरॉक्स प्रत, हे निकष व कागदपत्रे आवश्यक आहेत.
या योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी साधारणत:
दि.30 सप्टेंबर 2021 पूर्वी संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या
कार्यालयाशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा व आवश्यकत्या
सर्व कागदपत्रांच्या प्रतींसह परिपूर्ण अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत
समाज कल्याण विभागाकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment