केंद्र शासनाच्या बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी व्यक्ती/ संस्थांनी अर्ज सादर करावेत
अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत
बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.
बाल शक्ती पुरस्कार : ज्या मुलांनी
(वय 5 पेक्षा अधिक व 18वर्षा पर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण
शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे,
त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
बालकल्याण पुरस्कार:
वैयक्तिक
पुरस्कार- मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन
अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा
पुरस्कार दिला जातो.
संस्था स्तरावर: बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक
कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून
नसावी बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
बाल
शक्ती पुरस्कार सन 2022 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज
www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या
पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम
मुदत दि.15 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विनित
म्हात्रे यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment