दीपावली सणाच्या काळात जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

 


            अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्नपदार्थ जसे खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती इत्यादींची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील मिठाई, उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी :-

 आस्थापनेचा परिसर हा पर्यावरण दृष्टीने व किटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा,  कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक/ नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात यावेत, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्नपदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नयेत, मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा वापर करावा (100 PPM पेक्षा कमी), मिठाई ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, बंगाली मिठाई ही 24 तासाच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावे, मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे, मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे,  करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.

 जिल्ह्यातील मिठाई उत्पादक/विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी वरीलप्रमाणे नमूद केलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही याची, दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) पदावधित अधिकारी, अन्न  औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य रायगड-पेण श्री.लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक