अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्रशासनाने
अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते 10 वी या वर्गातील
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व
जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
सन 2008-09 पासून सुरु केली आहे.
यावर्षी NSP 2.0 पोर्टल वर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात
दि. 18 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात
येत आहे.
नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर
2021, शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख दि.15 डिसेंबर 2021 अशी आहे.
अर्ज भरण्यासाठीच्या अटी व
शर्ती -
- इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या
शासकीय/निमशासकीय/खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित
शासनमान्यता प्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी
ही योजना लागू आहे,
- अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्क्यांपेक्षा जास्त
गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. (केंद्रशासनाने कोव्हिड-19 च्या प्रादूर्भावामुळे
ही अट चालू वर्षासाठी नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी शिथिल करण्यात आली आहे.),
- पालकाचे (कुटूंबाचे एकत्रित )वार्षिक उत्पन्न रुपये एक
लाखापेक्षा कमी असावे,
- पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने
प्रमाणित केलेले असावे,
- कुटुंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
मिळणार नाही,
- अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक
माहिती, बँक व आधार माहिती अचूक भरावी,
- धर्माबाबतचे स्वयंघोषपणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक,
आधारकार्ड/आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची
प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत,
- या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर
तत्सम शिष्यवृत्तींचा लाभ घेतलेला नसावा,
- एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थींनीसाठी
राखीव आहे,
- विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वसतिगृहात राहत असतील
अथवा राज्यशासनाच्या वसतिगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतिगृहाचे
विद्यार्थी म्हणून गणले जातात तसेच वसतिगृहामध्ये भरलेल्या शुल्काच्या पावत्या
शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे.
सर्वसाधारण सूचना :-
- सन 2020-21 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या/शिष्यवृत्ती
मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी
सन 2021-22 करिता नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे,
- नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना
भरता येईल तसेच एका विद्यार्थ्याने नवीन/नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरविले
जातील,
- विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे, नसल्यास पालकांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याची
माहिती अर्जात भरता येईल.
- इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे
अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर
भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे.
- हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे,
- अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा
क्रमांक पालकांचा असेल तर तो 02 पाल्यांसाठीच वापरता येईल.
उद्दिष्टे :-
- अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया मागास गुणवत्ताधारक
विद्यार्थ्यांना इ.1 ली ते 10 वी पर्यंत शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे,
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची होणारी गळती थांबविणे,
- अल्पसंख्यांक पालकांना त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी
उत्तेजन देणे,
- अल्पसंख्यांक मुलांच्या पालकांचा त्यांच्या पाल्यांच्या
शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा भार कमी करणे,
- शिक्षणाव्दारे अल्पसंख्यांक मुलांचे सक्षमीकरण करणे,
- अल्पसंख्यांक समाजाची सामाजिक/आर्थिक उन्नती होण्यास मदत
करणे.
शाळेसाठी सूचना :-
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज
व कागदपत्रे वर्गनिहाय व वर्षनिहाय किमान 5 वर्ष जतन करुन ठेवणे,
- शाळा बंद झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता
नाही किंवा शाळेस शासनाची मान्यता आहे परंतु वर्गास मान्यता नाही, अशा सबंधित
शाळांमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारु नये.
- तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग
नसतानाही त्या वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज रिजेक्ट किंवा फेक मार्क
करावे,
- शाळा स्तरावरुन विद्यार्थ्यांचे अर्ज तपासताना सबंधित सर्व
कागदपत्रे तपासावीत तसेच विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, याची खात्री करावी.
- शाळास्तरावर एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही,
याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी.
- कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये तफावत
आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी. यासाठी
अर्ज डिफेक्ट करावा.
- विद्यार्थ्यांस संधी देवूनही माहिती चुकीची भरल्यास अर्ज
रिजेक्ट करण्यात यावा.
- विदयार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट आढळल्यास
अर्ज फेक मार्क करण्यात यावा.
- शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची माहिती आधारकार्डनुसार
NSP2.0 या पोर्टलवर भरण्यात यावी.
- सन 2015-16 पासून शिष्यवृत्तीचे वितरण केंद्र शासनामार्फत
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT(Direct Beneficiary Transfer) Mode व्दारे करण्यात
येते.
- अल्पसंख्यांक समाजाची सामाजिक/आर्थिक उन्नती होण्यास मदत
करणे, ही सर्व शाळांची जबाबदारी आहे.
सर्वसाधारण सूचना :-
- सन 2020-21 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या/शिष्यवृत्ती
मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी
सन 2021-22 करिता नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे,
- नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना
भरता येईल.
- तसेच एका विद्यार्थ्याने नवीन/नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरविले
जातील,
- विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे, नसल्यास
पालकांचे राष्ट्रीयकृत बँकखात्याची माहिती अर्जात भरता येईल,
- इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे
अर्ज National Scholarship Portal
(NSP 2.0) (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित
शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे.
- हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे,
- अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा
क्रमांक पालकांचा असेल तर तो 02 पाल्यांसाठीच वापरता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्रशासनाने
अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते 10 वी या वर्गातील
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व
जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
सन 2008-09 पासून सुरु केलेल्या या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी
घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती ज्योत्स्ना शिंदे-पवार
यांनी केले आहे.
मनोज शिवाजी सानप
जिल्हा
माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग
00000
Comments
Post a Comment