जिल्ह्यातील 31 हजार 873 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा, तर दहावीची परीक्षा देणार 33 हजार 500 विद्यार्थी
अलिबाग,दि.03 (जिमाका):- महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12
वीच्या (उच्च माध्यमिक) परीक्षा शुक्रवार, दि.4 मार्च 2022 पासून जिल्ह्यातील 190 परीक्षा
केंद्रावर तर 10 वीच्या परीक्षा मंगळवार, दि.15 मार्च 2022 पासून सुरु होत असून यावेळी
कॉपी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 8 भरारी पथके स्थापन करण्यात आली
आहेत. परीक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग
सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. या परिक्षेला 12 वीचे एकूण 31 हजार 873 विद्यार्थी आणि
10 वीचे 33 हजार 500 विद्यार्थी बसले असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक
शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
परीक्षेचे
वेळापत्रक पुढीलप्रमाणे:- इयत्ता (12वी)- शुक्रवार, दि.4 मार्च ते बुधवार, दि.7 एप्रिल
2022, इयत्ता (10 वी)- मंगळवार, दि.15 मार्च
ते गुरुवार दि.4 एप्रिल 2022.
कोरोना
विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे
केंद्र असणार आहे. याचा मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना लाभ होणार
आहे. जिल्ह्यात 16 परिरक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा 46 मुख्य
परीक्षा केंद्र व 144 उपकेंद्रांवर पार पडणार आहे.
15 किंवा
त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांची परीक्षा त्याच कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. तर 15
पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा
मुख्य परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.
00000
Comments
Post a Comment