प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी दि.31 जुलै अखेरपर्यंत e-KYC पूर्ण प्रमाणीकरण पूर्ण करावे -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
अलिबाग, दि.09 (जिमाका):-
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत नोंदणीकृत
पात्र लाभार्थ्यांना e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुषंगाने
राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी
ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer
Corner या टॅब मध्ये किंवा पी.एम.किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वतः
e-KYC प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर e-KYC प्रमाणीकरण
बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. तसेच केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर
बायोमॅट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रति बायोमॅट्रिक
प्रमाणीकरण दर फक्त रु.15 निश्चित करण्यात आला आहे.
तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत
ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment