प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC पूर्ण करण्यास दि.31 जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ
अलिबाग, दि.09 (जिमाका):-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची
ई-के.वाय.सी. (e-KYC) करण्याबाबतचे उपायुक्त (कृषी गणना) तथा पथक प्रमुख पी.एम.किसान
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील पत्राच्या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची ई-के.वाय.सी. (e-KYC) बंधनकारक
करण्यात आले आहे.
तरी या योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ई-के.वाय.सी.
( e-KYC ) पूर्ण करण्यास दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31
जुलै 2022 अखेरपर्यंत ई-के.वाय.सी. (e-KYC) पूर्ण करावी, असे आवाहन अलिबाग तहसिलदार
तथा नोडल अधिकारी श्रीमती मीनल दळवी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment