100% अनुदानावर स्टॉल मिळण्यासाठी गटई कामगारांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावेत
अलिबाग, दि.08 (जिमाका):- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या गटई कामगारांची आर्थिक उन्नती व्हावी, याकरिता 100% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पात्र लाभार्थ्याना शासनामार्फत मंजूर करण्यात येते. ही योजना लाभार्थ्यांना गटई व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येऊन उदर निर्वाहाचे साधन प्राप्त होण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्यामार्फत राबविण्यात येते.
अनुसुचित जाती प्रवर्गातील गटई कामगारांना हा व्यवसाय करताना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासनाने ही योजना सन 1997 पासून सुरु केली आहे.
योजनेच्या अटी:-
1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, 2) अर्जदार हा अनुसूचित जातीतील गटई कामगार असावा, 3) वय 18 ते 50 असावे, 4) वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु.40 हजार, शहरी भागात रु.50 हजार पेक्षा जास्त नसावे, 5) गटई स्टॉलसाठी मागणी केलेली जागा ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी ताबा दिलेला असावा किंवा स्वत:ची असावी.
तरी इच्छुक अनुसूचित जातीमधील गटई कामगारांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment