प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलैपर्यंत ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
अलिबाग, दि.26 (जिमाका):- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण 1 लाख 73 हजार 938 लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 1 लाख 43 हजार 156 लाभार्थ्यांची आधारकार्डची माहिती पी.एम.किसान पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे.
तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
केंद्र शासनाकडील नवीन नियमानुसार पात्र लाभार्थ्यांचा पी.एम.किसान योजनेचा लाभ हा त्यांचे आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केला जाणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना पी.एम.किसान पोर्टलवर ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी दि.31 जुलै 2022 पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.
अशा प्रकारे पूर्ण करा ई-केवायसी:-
स्टेप 1- मोबाईलवरून गूगल क्रोमवर www.pmkisan.gov.in टाईप करावे. त्यानंतर तुम्ही पी.एम.किसान पोर्टलवर जाल व तिथे तुम्हाला ई-केवायसी (e-KYC) असे लिहिलेले दिसेल. तिथे क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाकून सर्च बटण दाबा.
स्टेप 2- नंतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर चार अंकी ओटीपी येईल, तो तिथे टाका.
स्टेप 3- त्यानंतर ऑथेंटिफिकेशनसाठी बटण दाबा. त्यानंतर पुन्हा 6 अंकी आटीपी येईल. तो भरून सबमिट बटण दाबा. पूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे केली तर ई-केवायसी (e-KYC) पूर्ण होईल. नाहीतर Invalid असा पर्याय दिसेल. यामुळे जूलै महिन्यात येणाऱ्या तुमच्या हप्या यवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधार सेवा केंद्रावर जाऊन ते दुरुस्त करून घ्यावे.
तसेच ग्राहक सेवा केंद्र (CSC) किंवा महा ई-सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.
तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment