मध केंद्र योजना (मधमाशापालन) योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र व्यक्ती/संस्थांनी अर्ज करावेत
अलिबाग, दि.28 (जिमाका):- उद्योग,
उर्जा व कामगार विभागाच्या दि.18 जून 2019 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण
राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र
व्यक्ती/संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
मध
उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के
स्व-गुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/ प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा
संरक्षक व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्ठ्ये आहेत.
योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता:
वैयक्तिक मधपाळ या
लाभाकरिता पात्रता पुढीलप्रमाणे- अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास
प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य, केंद्रचालक
/ प्रगतीशिल मधपाळ, किमान 10 वी उत्तीर्ण, वय 21 पेक्षा जास्त, अशा व्यक्तीच्या
नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर
शेत जमीन, किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन, व
मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्रचालक संस्था या
लाभाकरिता पात्रता पुढीलप्रमाणे - संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा
भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. 1 एकर शेत जमीन
स्वमालकीची / भाड्याने घेतलेली असावी, संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध
उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.
आग्या मधपाळ, प्रशिक्षण व संच किट वाटप- लाभार्थी
पारंपारिक आग्या मध संकलन करणारा असावा, वय 18 ते 50 वर्षे, साक्षर असावा.
लाभार्थी
निवड प्रकियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र
लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे
अनिवार्य राहील.
अधिक
माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग
मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजार जवळ, अलिबाग, रायगड, दूरध्वनी: 02141-222642
किंवा 7020187220 किंवा संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व
ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला क्रमांक 5, महाबळेश्वर, जि.सातारा, पिन - 412806,
दूरध्वनी क्रमांक: 02168- 260264 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग
अधिकारी नित्यानंद पाटील यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment