जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नागरिकांकरिता “तिरंगा” उपलब्ध
“घरोघरी तिरंगा” अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन
अलिबाग, दि.04 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत दि.13 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातही हे अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल, नगरपालिका/नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी नागरिकांकरिता तिरंगा उपलब्ध होण्यासाठी विक्री केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातही नागरिकांकरिता तिरंगा उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांना प्रती ध्वज 30 रुपये याप्रमाणे तिरंगा उपलब्ध होणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या विक्री केंद्राचा लाभ घेत “हर घर तिरंगा” अर्थात “घरोघरी तिरंगा” हे अभियान जिल्ह्यात यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment