गणेशोत्सवानिमित्त शांतता कमिटीची आढावा बैठक संपन्न
अलिबाग,दि.29
(जिमाका) :- कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव दि.31 ऑगस्ट
2022 पासून सुरु होत आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात " गणेशोत्सव 2022 " निमित्त शांतता
कमिटीची आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी शांतता कमिटीचे सर्वश्री सदस्य श्री.प्रशांत
नाईक (अलिबाग), श्री.सुरेश म्हात्रे (अलिबाग), श्री.निलेश घाटवल (मुरुड), श्री.अरुण
शिवकर (पेण), श्री.राजू पिचिका (पेण), श्री.रमेश
कदम (कर्जत), कृष्णा पारंगे (खालापूर), श्री.अमित शहा (खालापूर), श्री.पानसरे (नागोठणे),
शेख अब्दुल सलीम (म्हसळा), चंद्रकांत लाड (महाड), रामदास कळंबे (पोलादपूर), श्री.प्रदिप
देशमुख (रोहा), अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे,
उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग, राष्ट्रीय मार्ग विभागांचे विभागप्रमुख,
सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख आदी उपस्थित
होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव
यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण आहे. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत
जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, यासाठी पोलीस विभागाने योग्य ते
नियोजन करावे. यावेळी शांतता कमिटीच्या सदस्यांनी
आपल्या मनोगतात त्यांचे काही प्रश्न व समस्या मांडल्या. या समस्या जिल्हा प्रशासनाकडून
सकारात्मक भूमिकेतून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून उपस्थित
शांतता कमिटीच्या सदस्यांना देण्यात आली.
आपल्या प्रास्ताविकात अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गणेशोत्सव कालावधीत
पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना
दिली.
००००००
Comments
Post a Comment