हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रशासनाकडून मौन (स्तब्धता) पाळून हुतात्मा दिन संपन्न

 



 

अलिबाग,दि.30 (जिमाका):- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दि. 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.

त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हा प्रशासनाकडून सकाळी 11 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता ) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला.

यावेळी तहसिलदार  डॉ.सतिश कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक