संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची तयारी सुरू 7 कोटी 61 लाख रुपये खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार 1 हजार 328 गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश
अलिबाग,दि.2(जिमाका)
:- रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी
जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात
आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. तसेच पाणी
टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी 7 कोटी 61 लाख 58 हजार रुपयांचा पाणी
टंचाई आराखडा तयार करुन मंजूरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात
1 हजार 328 गावे व वड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात
आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात
दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना
करण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला
आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर,
बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती
करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या
आहेत. त्यानुसार 1 हजार 328 गावे वाद्यांवर संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना
करण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील
यांनी कळविले आहे.
00000000
Comments
Post a Comment