साडे चार लाख बालके, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीस झाली सुरुवात जिल्हा परिषदेची जागरूक पालक- सुदृढ बालक मोहीम

 

 

अलिबाग,दि.13(जिमाका):- शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह बाळाकांच्या आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करणे साठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेला जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सुरुवात केली.

               ही मोहीम पुढील दोन महिने राबविली जाईल. मोहीम यशस्वी करण्यासाठी एकून 257 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील 30 वैद्यकीय अधिकारी, 161 समुदाय आरोग्य अधिकारी, 66 प्राथमिक आरोग्य केंद्रातील/ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी आणी शाळांना भेट देऊन आरोग्य तपासणी करतील.   

            जिल्ह्यातील एकूण 2 हजार 528 शासकीय, 385 निमशासकीय आणि 246 खासगी शाळांमधील 3 लाख 21 हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच 3 हजार 59 अंगणवाड्या व 72 खासगी नर्सरी शाळेमधील 1 लाख 40 हजार बालकांची तपासणी होणार आहे. अशा प्रकारे पुढील दोन महिन्यात जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार विद्यार्थ्यांची (0 ते 18 वर्ष वयोगटातील) आरोग्य तपासणी केली जाईल.

               मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाना मोहीम कालावधीमध्ये जास्तीत जास्त बालक/विद्यार्थी अंगणवाडी-शाळेत हजर राहतील, याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये बालकांमधील जन्मजात व्यंग, रक्तक्षय, दाताचे विकार, डोळ्याचे विकार, तिरळेपणा, दुभंगलेले ओठ, हाडाचे व्यंग, जीवनसत्व कमतरता, इत्यादी आजाराचे निदान व उपचार केले जाणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत.

              जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी मोहीम कालावधी मध्ये जास्तीत जास्त बालकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी,असे आवाहन पालकांना केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक