शेतकऱ्यांनी बियाणे,खते, औषधे खरेदी करताना काळजी घ्यावी --उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे
अलिबाग,दि.24(जिमाका):- खरीप हंगामात भात हे पीक महत्त्वाचे आहे. पिकाची उत्पादकता चांगली येण्यासाठी बियाणे, खते, औषधे हे घटक महत्त्वाचे आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे, खते, औषधे खरेदी करावे, विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे, बिलावर दुकानदाराचे नाव, बिल क्रमांक, उत्पादकाचे नाव, बियाणे नाव, लॉट नंबर, किंमत इत्यादी असल्याची खात्री करावी. बियाणे पिकावरील उगवण शक्ती, भौतिक व अनुवंशिक शुद्धता टक्केवारी, चाचणी तारीख, वैधता, वर्ष, वजन इत्यादी तपासून घ्यावे, छापील किंमतीपेक्षा जास्त दराने बियाणे, खते, औषधे खरेदी करू नये, खरेदी केलेल्या बियाणांची पावती पीक कापणी पर्यंत जपून ठेवावी. बियाणाची पिशवी फोडताना खालील बाजूंनी फोडावी त्यामुळे पिशवीचे लेबल व प्रमाणीकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहील, बियाण्याच्या पिशवीचा टॅग व लेबल पीक काढणीपर्यंत जपून ठेवावे, पिशवीत मुठभर बियाणे शिल्लक राखून पीक काढणी पर्यंत जपून ठेवावे, मुदत संपलेले पॅकिंग फोडलेले किंवा सुटे बियाणे खरेदी करू नये, बियाणे उगवण, भेसळ याबाबत काही तक्रार करावी.
तरी शेतकरी बांधवांनी बियाणे,खते, औषधे खरेदी करताना काळजी घ्यावी. अधिक माहितीकरिता आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचीशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.
००००००००
Comments
Post a Comment