रायगड ‍जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत 14 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सागरमित्रांची तात्पुरत्या स्वरूपात करणार नियुक्ती

 

 

अलिबाग,दि.22(जिमाका):- प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत रायगड ‍जिल्ह्यात 14 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सागरमित्र या पदाची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. मासळी उतरविण्याची केंद्रांची नावे, सागरमित्र नेमणूकीबाबत अटी व शर्ती आणि कार्ये व जबाबदाऱ्या  खालीलप्रमाणे आहेत.

मासळी उतरविण्याची केंद्रे:- 

परवाना अधिकारी उरण कार्यक्षेत्र:- 1. उलवे-मोहा, 2. दिघोडे, 3. मोरावे-गव्हाण, परवाना अधिकारी मुरुड कार्यक्षेत्र:- 4. न्हावे, 5. मुरुड, 6. राजपुरी, 7. आगरदांडा, परवाना अधिकारी श्रीवर्धन कार्यक्षेत्र:- 8. वाशी, 9. कुडगाव, 10. आदगाव, 11. मेंदडी, 12. खरसई, 13. बागमांडला, 14. शेखाडी,        

अटी व शर्ती :- शैक्षणिक पात्रता ही  कमीत कमी 12 वी विज्ञान शाखा मधून उत्तीर्ण ही आहे. ज्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जास्त असेल तर त्यास प्राधान्य देण्यात येईल, मत्स्यविज्ञान पदविका (Fisheries Diploma) 3 वर्षे उत्तीर्ण उमेदवार हा इयत्ता 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण समकक्ष ग्राह्य धरण्यात येईल व मत्स्यविज्ञान पदविका उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल,  वय 18 वर्षांपेक्षा कमी व 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे, स्थानिक किनारपट्टीवरील मच्छीमार गावातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, उमेदवारास संगणक तसेच सांख्यिकी माहितीचे ज्ञान असणे आवश्यक आहे,

उमेदवाराची नेमणूक फक्त गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. सर्व सागरमित्रासाठी प्रति महिना रु.15 हजार प्रति सागरमित्र याप्रमाणे एकसमान प्रोत्साहन/ मानधन देण्यात येईल. सागरमित्रांची नेमणूक संपूर्णत: अर्धवेळ आधारावर असेल. नियुक्त केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील उमेदवारास नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे नियम, अटी व शर्ती लागू राहणार नाहीत तसेच त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणतेही वेतन व भत्ते तथा अनुषंगिक लाभ अनुज्ञेय/लागू राहणार नाहीत, नियुक्त केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील उमेदवारास सेवेचे कोणतेही उत्तरदायित्व शासनावर किंवा आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयावर राहणार नाही,  नियुक्त केलेल्या उमेदवार यांनी कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील, नियुक्त केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील उमेदवारास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा सामावून घेण्याबाबतचे वा नियमित सेवेचे कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार/ हक्क नसेल, उमेदवाराने स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

सागरमित्रांचे कार्य व जबाबदाऱ्या :- सागरमित्र हे सरकार आणि मच्छीमार यांच्यातील इंटरफेस आहेत आणि कोणत्याही सागरी संपर्कातील प्रथम व्यक्ती म्हणून काम पाहणे, तसेच मच्छिमारांच्या मत्स्यव्यवसाय संबंधित मागण्या/ सेवांची माहिती देण्याचे काम करणे, स्थानिक मच्छिमारांमध्ये विविध सरकारी योजना आणि कार्यक्रम बाबत जनजागृती करणे, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहन देणे, मत्स्योत्पादन संकलनाचे काम पाहणे, मत्स्योत्पादन, मत्स्य किंमती इ. यांच्याबाबतची माहिती संग्रहीत करणे/संकलित करणे, मच्छिमारांना प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी गतीशील करणे.

तरी आपल्या मच्छीमार गावातील वरील नमूद अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांचे अर्ज, पूर्ण माहिती या कार्यालयास दि.28 जून 2023 पर्यंत सादर करावी. प्राप्त अर्जांचा विचार करून मुलाखतीची तारीख कळविण्यात येईल व गुणवत्तेनुसार सागरमित्र ‍निवडण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, श्री.संजय पाटील यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक