विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम लसीकरण न झालेल्या बालकांनी व गर्भवती महिलांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा--जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने

 

 

रायगड (जिमाका)दि.5:- रायगड जिल्हा रुग्णालय व अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय शहरी कार्यक्षेत्रातील 0 ते  05  वर्ष या वयोगटातील बालके तसेच गर्भवती महिला लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी मिशन इंद्रधनुष्य 5.0 राबविण्यात येणार आहे. तीन फेऱ्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेतील पहिली फेरी दि.7 ऑगस्ट ते दि.12 ऑगस्ट 2023 दरम्यान सर्व शहरी कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांनी व गर्भवती महिलांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे.

 विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 या मोहिमेंतर्गत 0 ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. 2 ते 5 वर्ष या वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बुस्टर डोस राहिला असेल, त्यांचे ही लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये शहरी क्षेत्रात 490 लाभार्थ्यांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांचे लसीकरण या कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.

      या मोहिमेची पहिली फेरी दि.7 ते 12 ऑगस्ट, दुसरी फेरी दि.11 ते दि.16 सप्टेंबर, तर तिसरी फेरी दि.9 ते दि.14 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. ही मोहीम सर्व शहरी क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्याकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नियमित लसीकरण व मिशन इंद्रधनुष्य 5.0 अंतर्गत सर्व शहरी क्षेत्रातील एक ही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय शहरी हद्दीमध्ये ठिकठिकाणी लसीकरण सत्रे सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिली आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक