पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यास बंदी
रायगड दि.20(जिमाका):- Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या जलयानांना दरवर्षी दि.26 मे ते दि.31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात सुरक्षिततेच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येते.
त्यानुसार Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी असलेल्या जिल्ह्यातील जलयानांना दि.26 मे ते दि.31 ऑगस्ट 2024 या कालावधीत सुरक्षिततेच्या कारणास्तव महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारितील बंदरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, राजपुरी बंदरे समूह कॅ.सी..जे.लेपांडे यांनी कळविले आहे.
००००००
Comments
Post a Comment