अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा

 

 

        रायगड, (जिमाका) दि .8:-  राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वार्डावण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

        कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भातज्वारीबाजरीमकानाचणी (रागी)तूरमूगउडीदसोयाबीनभुईमुगसुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

         पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै दूसेच भातज्वारीबाजरीमकानाचणी (रागी)तूरसोयाबीनभुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे.स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व तीजमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्यजिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची काग पत्रे -  विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन७/१२८-अ चा उताराजात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)पिकस्पर्धेसाठी शेतक-याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा,  बँक खातेचेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

      पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूपसर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्यजिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथमद्वित्तीय व तृतीय क्रमाकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

तालुकापातळी सर्वसाधारण व आदिवासी गट रुपये पहिले 5 हजारदुसरे 3 हजारतिसरे 2 हजारजिल्हापातळी पहिले 10 हजारदुसरे 7 हजारतिसरे 5 हजारराज्यपातळी पहिले 50 हजारदुसरे 40 हजारतिसरे 30 हजार.

खरीप हंगाम सन २०२४ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्यरविंद्र बिनवडे यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागमहाराष्ट्र राज्यसंकेतस्थळ- www.krishi.maharashtra.gov.in किवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड