भातशेती, भाजीपाला लागवड व पशुधनाबाबत शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन

 

 

रायगड,दि.09(जिमाका):- दि.07 जुलै 2024 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी भातशेतीभाजीपाला लागवड व पशुधनाबाबत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत पुढीलप्रमाणे काळजी घेण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.

           भात आणि नागली- पुर्नलागवड केलेल्या भात आणि नाचणी खाचरातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. सखल भागात पावसाचा अंदाज घेवून भातनाचणी पुर्नलागवडीची कामे पुढे ढकलावी. मजगी आणि वरकस भागामध्ये भात आणि नागली पिकांची पुर्नलागवड पावसाची तिव्रता कमी असताना करावी.

        भाजीपाला आणि नवीन लागवड- भाजीपाला आणि नवीन लागवड केलेल्या फळझाडांमध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था करावी.

       पशुधन- पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधण्याची व त्यांना हिरवा चारा आणि स्वच्छमुबलक पाणी देण्याची व्यवस्था करावी.

 कुक्कुटपालनाच्या ठिकाणी हवामान ऊबदार राहण्यासाठी विजेचे बल्ब लावण्याची व्यवस्था करावी.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड